Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग घडवून आणणाऱ्या आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार टीकेचे धनी ठरले. शिवसेनेतून 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेले आणि नव्याने शिंदे-फडणवीस सरकार बनविलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबतचे युती आपल्याला कधीच मान्य नव्हती, शिवसेनेने त्यांचे हिंदुत्व सोडले अशी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ही युती कधीच मान्य केली नसती. असे देखील शिवसेनेतून बाहेर पडलेले अनेक नेते म्हणत आहेत. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. ज्या शरद पवारांवर आज टीका केली जाते त्या पवारांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षविरहीत राजकीय संबंध कसे होते हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अन्न औषध प्रशासनाने नाशिकरोड भागात केलेल्या तब्बल १८ लाख रुपयांचा मिक्स गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला व सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाने ज्या गोडावूनवर छापा टाकला तेथून अनेक पानटपऱ्यासह दुकानांमध्ये गुटखा पोहचविला जात असल्याचा अंदाज आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात यासंदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा दोन पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी नाशिक रोडवरील सचदेव आर्केड या ठिकाणी असलेल्या गोडावूनवर छापा टाकला असता त्यांना तेथे ३ लाख ६१ हजार ५७० रुपयांचा वैधानिक इशारा नसलेला सिगारेटचा साठा आढळून आला. हा माल ताब्यात घेत गोडावून सील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खरी शिवसेना कोणाची यावरुन न्यायालयात वाद विवाद सुरु असतांना दसरा मेळाव्यासाठीही शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला न्यायालयात जावे लागले. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवाजी पार्कवर ठाकरेंच्याच शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतांना बीकेसीत शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा होत आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी दसरा मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी चालविलेल्या कोट्यावधी रुपयांच्या उधळपट्टीची ईडी आणि आयकर विभागाने चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. लोंढे म्हणाले, शिंदे गट राज्याच्या विविध भागातून एसटी व खासगी बसेसमधून कार्यकर्ते आणत आहे. यासाठी एसटी महामंडळाकडे दहा कोटी रुपये भरले असून ते मोजण्यासाठी महामंडळाला दोन दिवस लागले, असे वृत्त माध्यमातुन समजले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याचा फतवा राज्य शासनाने काढला आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात छात्रभारती संघटना आक्रमक झाली आहे. मराठी शाळा ह्या गोरगरीब जनतेच्या आहेत, त्या कोणाच्या बापाच्या नाहीत असे ठणकावत छात्रभारतीने या निर्णयाचे पत्रक फाडून टाकत आणि संगमनेरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदविला आहे. कमी पटसंस्थेच्या राज्यातील सतरा हजारापेक्षा अधिक शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची शासनाची ही कृती अत्यंत निषेधार्ह आहे, शासनाच्या या निर्णयाचा आणि गरिबांचे शिक्षण बंद करणाऱ्या मानसिकतेचा छात्रभारती तीव्र निषेध व्यक्त करत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सेवा पंधरवड्यानिमित्ताने राबविलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून १७३४ जातवैधता पडताळणी प्रमाणपत्रांचे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन वाटप करण्यात आले असून जिल्ह्यातील १११ महाविद्यालयांमधील प्राचार्य व कर्मचाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या ऑनलाईन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. जातप्रमाणपत्र वाटप करतांना त्रुटी राहू नयेत म्हणून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची ऑनलाईन वेबनारद्वारे कार्यशाळा घेण्यात आली. अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास पानसरे यांनी दिली. सामान्य नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित अर्जांचा कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राबविण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिक्षणातून खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होते. बोलीभाषा ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याला बोलीभाषा चांगली येते तोच इतर भाषांवर प्रभुत्व गाजवू शकतो. सर्व शिक्षण हे बोलीभाषेतून मिळाल्याने ते ज्ञान वाढीस अधिक पूरक ठरते. असे प्रतिपादन दिल्लीच्या जेएनयु विद्यापीठाचे प्रा. शरद बाविस्कर यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात ‘भुरा एक शैक्षणिक आत्मचिंतन’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे होत्या. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, सहसचिव दत्तात्रय चासकर, रजिस्टर बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य शिवाजीराव नवले, डॉ. बाळासाहेब वाघ, समन्वयक प्रा. लक्ष्मण घायवट, प्रा. तुळशीराम जाधव, प्रा. हेमलता राठोड आदी उपस्थित…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील शिधापत्रिकाधारक जनतेची दिवाळी गोड करणार आहे. शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात म्हणजेच प्रत्येकी 100 रुपयात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणार आहे. दसरा मेळाव्या आधीच घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे शिधापत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे 500 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत घेतला आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत न्यायालयाने 10 ऑक्टोबर पर्यंत वाढ केल्याने राऊत यांना दसराही तुरुंगातच घालवावा लागणार आहे. त्यामुळे उद्याचा शिवसेनेचा दसरा मेळावा त्यांच्या गैरहजेरीत होणार आहे. खासदार राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होऊन त्यांची सुटका होईल असा अंदाज होता मात्र न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 10 ऑक्टोंबर पर्यंत पुन्हा वाढ केली आहे. तोपर्यंत राऊत यांना तुरुंगातच राहावे लागेल. 10 ऑक्टोंबरलाच त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात व्यासपीठावर राऊत यांच्या नावाची खुर्ची रिकामी ठेवण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सुसंस्कारित पिढी घडवण्याबरोबरच स्त्रियांनी स्व-संरक्षणार्थ सक्षम होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या शारदा कर्पे यांनी केले. विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी संगमनेर प्रखंडाने दुर्गावाहिनीच्या स्थापना दिनी दुर्गाष्टमी निमित्त संगमनेरातील माऊली फर्निचर हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कर्पे “जागर स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पूजा जाधव उपस्थित होत्या. कर्पे म्हणाल्या, सरस्वती नको सावित्री हे राजकारण सध्या सुरू आहे, सरस्वती ही विद्येची देवी असून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाचा पुढाकारामुळेच आपण सुशिक्षित झालो आहे, त्यामुळे दोन्हीही आमच्यासाठी पूज्यनीय आहे. या कार्यक्रमात हिंदु संस्कृती, महिला सक्षमीकरण, लव-जिहाद सारख्या अनेक विषयांवर प्रबोधन केले गेले. पारंपारिक वेशभूषा,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भाजप नेते माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या एकहाती साम्राज्याला हादरा देत सत्तांतर करण्यात यश मिळविलेल्या आणि महाविकास आघाडीच्या वर्चस्वाखाली आलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सिताराम गायकर यांची तर उपाध्यक्षपदी अशोक भांगरे यांची मंगळवारी सर्वानूमते निवड करण्यात आली. भाजप नेते, माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड पितापुत्राच्या अधिपत्याखाली असलेल्या व नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने पिचड यांच्या पॅनेलचा सपशेल धुव्वा उडविला. कारखान्यावर गेली २८ वर्षे निरंकुश सत्ता भोगणाऱ्या पितापुत्रांना कारखान्याच्या या निवडणुकीत चंचुप्रवेश देखील करता आला नाही. पिचड पिता-पुत्रांनाही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. कारखान्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रगण्य असणाऱ्या व सुमारे ५० देशांमध्ये तीन लाखाहून अधिक कर्मचारी असलेल्या कॅपजेमिनी या कंपनीत अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील १११ विद्यार्थ्यांची चांगल्या पगारावर थेट निवड झाली. अशी माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली. डॉ. व्यंकटेश म्हणाले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज हे राज्यातील अग्रमानांकित महाविद्यालय ठरले आहे. नॅकचा ‘ए प्लस’ दर्जा मिळवणाऱ्या या महाविद्यालयामध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या थेट मुलाखती आयोजित करत असतात. कॅपजेमिनी या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपनीने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या सुरुवातीला अमृतवाहिनीतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या व समर्पित वृत्तीने समाज घडविणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार हा त्यांना प्रेरणा देणारा व जबाबदारी वाढविणारा आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या चाणक्य मंडळ परिवाराच्या संचालिका रोहिणीताई गुट्टे-नागणे यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त संगमनेर पंचायत समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा संगमनेर महाविद्यालयाच्या साईबाबा हॉलमध्ये पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे व्यासपिठावर उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक सुशीला धुमाळ, वृषाली कडलग व अशोक शेटे यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. व्ही-स्कुलमध्ये योगदान देऊन पंचायत समितीचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची सोमवारी प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईत लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. माजी आमदार वैभव पिचड यांनी स्वत:ला सावरत कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. ८१ वर्षीय पिचड सकाळी सातच्या सुमारात फेरफटका मारत असतांना अचानक त्यांचा रक्तदाब अनियमीत झाल्याने त्यांची प्रकृती खालावली. माजी आमदार वैभव पिचड यांनी तातडीने त्यांची डॉ. मारुती भांडकोळी आणि डॉ. बाबासाहेब गोडगे यांच्याकडून तपासणी करुन घेतली. मात्र त्यांनी पिचड यांना तातडीने लिलावतीत हलविण्याचा सल्ला दिला. पिचड यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजुर येथील निवासस्थानी धाव घेतली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पिचड…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात संगमनेर नगर परिषदेने पश्चिम विभागात देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. तसेच कचरा मुक्त शहराअंतर्गत थ्री स्टारचे मानांकन देखील पालिकेत प्राप्त झाल्याची माहिती प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आणि मुख्याधिकारी राहुल वाघ दिली. 2022 मध्ये झालेल्या या स्पर्धेचे मानांकन नुकतेच जाहीर करण्यात आले असून संगमनेर नगर परिषदेने पुन्हा एकदा नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी या अभियानात मोठी मेहनत घेत संगमनेर कचरा मुक्त करण्यात आणि या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने पालिकेला कोट्यावधी रुपये बक्षीस मिळून देण्याचे काम केले होते. आता प्रशासकीय कालावधीत देखील हाच पायंडा कायम राहिला आहे. केंद्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देणाऱ्या अविनाश वाघमारे याला लोणावळा पोलीसांनी अटक केली आहे. वाघमारे याने खोडसाळपणा करत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर या कथित हत्येच्या धमकी प्रकरणाचा उलगडा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातोय, अशी माहिती थेट पोलिसांच्या १०० नंबरवर देण्यात आली होती. सतर्क झालेल्या पोलिसांनी घाटकोपरमधील रहीवासी असलेल्या अविनाश वाघमारे याला ताब्यात घेतले. वाघमारे मुंबईहून सांगलीला जात असतांना लोणावळ्यात शनिवारी रात्री हा प्रकार घडला होता. १०० नंबरवरील या कॉलमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. पोलिसांनी या कथित प्रकरणाच्या तळाशी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कोणत्याही कामाजी लाज न बाळगता विविध व्यवसायात महिलांनी पारंगत झाले पाहिजेत. सक्षम होवून आपल्या पायावर उभे राहण्यासाठी विज्ञानवादी विचारसरणी स्विकारण्यासाठी मराठा सेवा संघ प्रयत्नशील आहे. सेवा संघात महिलांना मानाचे स्थान असून घरोघरी जिजाऊ पारायण होण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडने पुढे यावे व चांगला समाज घडवावा असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुनराव तनपुरे यांनी केले. संगमनेर मराठा सेवा संघाचा ‘जनसंवाद’ शासकीय विश्रामगृहात झाला. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, चंद्रकांत नवले, संपत देशमुख, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश सदस्य डॉ. दिपाली पानसरे, जिल्हाध्यक्ष श्रध्दा वाणी, जिल्हा उपाध्यक्ष…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सत्य, अहिंसा आणि त्यागाची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने केवळ भारतच नव्हे तर जग चालत असल्याने गांधीजी आंतरराष्ट्रीय शांतीदूत ठरल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालयामध्ये कॉग्रेस कमिटीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. तांबे बोलत होते. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, प्रमिला अभंग, बाळासाहेब पवार, सुनील कडलग, रमेश नेहे आदी उपस्थित होते. यावेळी गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात विविध क्षेत्रात काम करुन नावलौकीक मिळविणाऱ्या समाजातील विविध घटकातील महिलांच्या ‘यशोगाथा’ सांगणाऱ्या मुलाखती सुरु आहे. एकीकडे नवरात्रोत्सवात नवदुर्गांचा सन्मान होत असताना दुसरीकडे समाजातील यशस्वी महिलांच्या कर्तृत्व भरारीचा हा आलेख इतर महिलांसाठी अनुकरणीय लौकिकास्पद ठरत आहे. डॉ. जयश्री थोरात यांनी तळागाळातील महिला व मुलींच्या उन्नतीसाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकविरा फाउंडेशनची स्थापना केली असून या फाउंडेशनच्यावतीने तालुक्यात अनेक संकल्पना राबवल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. समाजातील महिलांना व मुलींना विविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कला, क्रीडा, साहित्य,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क २ ऑक्टोंबरच्या महात्मा गांधी जयंती दिनी पहाटेच पोलिसांनी संगमनेर शहरातील प्रतिष्ठीतांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ११ जुगाऱ्यांना तब्बल साडेपाच लाख रुपयांच्या मुद्देमालासह पकडले आहे. जुगार अड्ड्यावर छाप्यासाठी थेट घारगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील संगमनेरात आले होते. त्यामुळे पोलिस वर्तुळात या छाप्याची चर्चा रंगली आहे. संगमनेर शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या जोमात सुरु असून यावर नियंत्रण आणण्यात पोलीस प्रशासन अयशस्वी ठरले आहे. शहर पोलिसांनी याच आठवड्यात शहरातील कॉफी सेंटर, कॅफे सेंटरवर छापे मारुन तब्बल ३४ जोडप्यांना अश्लील चाळे करतांना पकडले होते. या घटनेमुळे शहरात अशा प्रकारचे अनैतिक व्यवसायही राजरोसपणे सुरु असल्याचे समोर आले होते. निरीक्षक सुनिल…
रविवार विशेष । प्रविण पुरो महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क उकेंविरोधी 31 मार्च 2022 रोजी ईडीने अटकेची कारवाई केली. इतर ज्येष्ठ नेत्यांविरोधात ईडीने कारवाईचा फास टाकल्याने उकेंच्या कारवाईकडे तेव्हा कोणाचं लक्ष जाऊ शकलं नाही. आता या अटकेच्या कारवाईला सहा महिने होत आहेत तरीही उके यांना जामीन मिळालेला नाही. उकेंवर कारवाई का झाली याची उत्तरं देताना उकेंच्या आई आणि वडिलांचीही उघडपणे देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं. पहाटे पाच वाजता उकेंच्या घरी पोहोचलेल्या ईडी अधिकार्यांनी उकेंच्या पत्नीला धक्काबुक्की केली. ती करताना तुम्ही फडणवीसांविरोधी बोलत असल्याचे हे परिणाम असल्याचं ईडीच्या अधिकार्यांनी ऐकवल्याचा आरोप उकेंचे वडील शेखर उके यांनी केला आहे. शेखर उके यांनी प्रसार माध्यमांपुढे…
